Vidhan Parishad: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असता महायुतीने राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांची वर्णी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी पत्रकार परिषद घेऊ शकतो. आणि निवडणुकांच्या तारखाची घोषणा करू शकतो. आणि कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे सरकारने आमदार नियुक्ती संदर्भात माहायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला होता आणि आज त्या राज्यपाल नियुक्त आमदारांची शपथविधी होणार आहे.
मंगळवारी भाजपचे 3, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 अशा एकूण सात आमदारांची शपथविधी दुपारी 12 वाजता होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शपथविधी विधिमंडळाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या 7 आमदारांची शपथविधी पार पडणार आहे. आणि राज्यपाल नियुक्त महायुती सरकारच्या सात जणांची विधानपरिषद आमदार म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. या सदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिकृत राजपत्र जारी केलेल आहे.
या 7 जणांची आमदार म्हणून नियुक्ती केली जाणार
मंगळवारी होणाऱ्या शपथविधी मध्ये सात जणांची नावे आहेत त्या नावांमध्ये पंकज छगन भुजबळ, भाजप नेत्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, इंद्रजीत नाईकवाडी, मनीषा कायदे, हेमंत पाटील यांची सर्वांचे राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून आज शासनाकडून वर्णी लावण्यात येणार आहे.
विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार जर शासनाने निवडले तर शिवसेना ठाकरे गट पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहे. 12 राज्यपाल नियुक्त आमदारांन पैकी महायुती सरकारच्यया 7 आमदारांची नाव निश्चित करण्यात आलेली आहेत त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेण्याचा इशारा शासनाला दिलेला आहे. या याचिके संदर्भातील चाललेला युक्तिवाद 7 ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेला आहे. पण अजून त्या संदर्भातला निकाल आलेला नाही म्हणून अशा प्रलंबित आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय घेणे उचित समजले जाणार नाही असं शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणं आहे.
आणि अशा परिस्थितीत जर राज्यपालांनी आमदार नियुक्तीचा निर्णय घेतला तर त्यांचे विरोधात शिवसेना ठाकरे गट उंच न्यायालयात धाव घेऊन न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.