‘राजा राणी’ वादात माघार, वकिलांनी सूरज चव्हाणची मागितली माफी

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Suraj Chauhan bigg Boss 5 winner : सूरज चव्हाणच्या अभिनयाने सजलेला ‘राजा राणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण भागातील सत्य प्रेमकथांवर आधारित हा चित्रपट तब्बल 300 पेक्षा जास्त थिएटर्समध्ये आणि 400 हून अधिक शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे, ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाण हा चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला.

वकील वाजिद खान (बिडकर) यांनी ‘राजा राणी’ चित्रपट समाजासाठी धोकादायक असल्याचा दावा केला होता. त्यानुसार, त्यांनी आरोप केला की हा चित्रपट चुकीचा संदेश देत असून, त्यामुळे समाजावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यांनी चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली होती, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. यानंतर, सूरज चव्हाणने आपल्या चाहत्यांना आवाहन केलं, ज्यामुळे सोशल मीडियावर ‘आय सपोर्ट सूरज चव्हाण’ या हॅशटॅगने एक मोठी मोहीम सुरू झाली.

राजा राणी च्या निर्मात्यांनी वकिलांना आवाहन केलं होत की, त्यांनी पूर्ण चित्रपट पाहून मग आपलं मत व्यक्त करावं. वाजिद खान यांनी चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या विधानामध्ये काही गैरसमज झाला असल्याची कबुली दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली आणि सांगितलं की, त्यांनी चित्रपटाची पूर्ण माहिती न घेता वक्तव्य केलं होतं.

प्रसिद्धीपत्रकादरम्यान चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दौलताडे आणि दिग्दर्शक शिवाजी दौलताडे यांनी सांगितलं की, ‘राजा राणी’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, त्याचा उद्देश चांगला संदेश देण्याचा आहे. दिग्दर्शक शिवाजी दौलताडे म्हणाले, “माझा चित्रपट समाजातील युवकांना योग्य मार्गदर्शन करतोय. चित्रपटाचे शेवट आशयपूर्ण आहे आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. आता “राजा राणी” या चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण पिक्चरवर बंदी आली असती तर निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं असतं आणि कलाकारांच्या देखील भावनांना ठेच पोचली असती. पण आता वकिलांनी बंदीचा निर्णय मागे घेतलेला आहे.

“मुख्य अभिनेता रोहन पाटीलने सांगितलं, “जर चित्रपटावर बंदी आली असती, तर आम्हाला प्रचंड मानसिक त्रास झाला असता.” या प्रकरणानंतर, चित्रपटावरील विरोध शांत झाला असून, प्रेक्षकांकडून ‘राजा राणी’ च्या टीमला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">