Sharad Pawar : महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या आढावा बैठकीत उपस्थित राहून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पवार यांचे भाषण सत्ता, निवडणुका आणि सामान्य माणसांच्या समस्यांवर केंद्रित होते. त्यांनी म्हटले की, “सत्ता येते आणि जाते, परंतु सामान्य माणसासाठी काय भूमिका घेतली हे महत्वपूर्ण आहे.
शरद पवार यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धेवर प्रकाश टाकला. “या वेळची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांचा एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.
पवारांनी विशेषत: पुणे जिल्ह्याबद्दल बोलताना सांगितले की, “पुणे जिल्हा खूप मोठा आहे. सत्ता पक्षाने दिली त्या सत्तेसाठी लोकांनी साथ दिली. परंतु ज्यांना निवडून दिलं, ते लोकांना विसरले.” हे बोलताना त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांपैकी 44 आमदार दुसरीकडे पळवून नेले. त्यात आंबेगावमधील आमदार देखील होते,” असे पवार म्हणाले.
पवारांनी आपल्या अनुभवांची सांगितली आणि दिल्लीत काम करण्याची आणि राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. “परंतु असं कधी घडेल, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु ते घडलं,” असे त्यांनी सांगितले. हे वक्तव्य त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर केले, ज्यामुळे त्यांनी अजित पवारांना नाव न घेता टीका केली.
आता वेळ आलीय,” असे सांगत पवारांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचा सल्ला दिला. “अनेकांना वाटलं की 56 मधले 50 गेले, परंतु सगळे पराभूत झाले. पुन्हा राज्यात 71 आमदार निवडून आले. काय घडलंय याची चिंता करायची नाही,” असे ते म्हणाले.
देवदत्त निकम यांच्या कार्याबद्दल बोलताना पवारांनी त्यांच्या 10 वर्षांच्या अनुभवाचे कौतुक केले. “देवदत्त निकम यांनी भीमा सहकारी कारखाना उत्तम चालविला. 250 कारखाने देशाचे प्रमुख पद दिलीप वळसे यांना दिले आहेत,” असे पवार म्हणाले. “मी माझा प्रामाणिक दाखविला. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला लोक साथ देतात,” असे ते पुढे म्हणाले.
पवारांचे हे भाषण त्यांच्या नेतृत्वाच्या अनुभवावर आणि सामान्य माणसांच्या समस्यांवर केंद्रित होते. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना एकजूट राहून काम करण्याचे महत्त्व सांगितले आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचा मार्ग दाखवला.तसेच, शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशाची आशा व्यक्त करण्यात आली आहे. पवार यांचे भाषण त्यांच्या दीर्घ अनुभवाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गतीचे प्रमाण होते, जे त्यांच्या समर्थकांसाठी प्रेरणादायी ठरले.