महाविकास आघाडीच्या दोन गटांमध्ये आत्तापर्यंत मोठी शर्यंत मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला चालू दिसत होती. ती शर्यंत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये चालू होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही काल दाखवून दिले की आपला पक्ष शर्यतीत सहभागी आहे. शरद पवारांच्या नेमकं डोक्यात मुख्यमंत्री पदाबबत कोण आहे…?
इस्लामपूर मध्ये झालेल्या सभेतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चांगलेच मोठे संकेत दिले आहेत. शरद पवारांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे नेते जयवंत पाटील यांच्याकडे राज्य सांभाळण्याची शक्ती आहे. असं बोलत शरद पवार यांनी जयवंत पाटलांना मुख्यमंत्री बनवण्या बाबतचा मोठा संकेत दिलेला आहे. शिवस्वराज्य यात्रेचा इस्लामपूर मध्ये समारोप देखील झाला. जयवंत पाटील भाषण करत असताना त्यांच्या नावाने इस्लामपुरात मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. आणि पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांनी सुरुवातीच्या वेळेस मुख्यमंत्री पदाबाबत मोठे संकेत दिले आहेत.
सकाळच्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी. शरद पवार यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतचे इस्लामपूरच्या सभेतले संकेत. यावर राऊत म्हणाले की शरद पवारांनी दोन महिने आधीच आम्हाला म्हटले आहे आमच्याकडून कोणीही मुख्यमंत्री पदा बाबतच्या शर्यतीमध्ये नाही आहे. पवारांना हेच सुचवायचं होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या शर्यतत आमचाही पक्ष आहे हे त्यांना सुचून द्यायचं होतं त्यामुळे ते बोलले असतील असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार हे कोणत्याही प्रकारचे असे संकेत कधीही देत नाही आणि राहिला विषय मुख्यमंत्री पदाबाबतचा तर त्यासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आहे.
महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्वात पहिले मुख्यमंत्री पदाबाबतचा चेहरा घोषित करावा अशी विनंती सर्वात पहिले उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्याकडे केली होती. पण त्यांनी कोणताही चेहरा न घोषित करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या म्हणण्यावरून हेच दिसून येते की मुख्यमंत्री पदाबाबतचा चेहरा निवडणुकीनंतर संख्याबळावर घोषित करण्यात येईल असं चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत फक्त काँग्रेस कडून नाना पटोले आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचेच नाव होते. त्यातच शरद पवार यांनी इस्लामपूर मध्ये झालेल्या सभेत एक नवीन चेहरा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत जयवंत पाटील यांना जोडून दिलं आहे.
आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेले आहेत त्यामुळे लवकरच मविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून लवकरच याद्या घोषित केल्या जातील. घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदावर बाबतच्या चेहरा हा निवडणुकीनंतरच घोषित करण्यात येईल. निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.