बैठकीत काय घडलं? संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया आणि 85-85-85 फॉर्म्युलाबाबतचे खुलासे”

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (मविआ) अंतर्गत जागावाटपावर अद्यापही तिढा कायम आहे. या संदर्भात शरद पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काल भेट घेतली. या बैठकीत महाविकास आघाडी 288जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मविआने 85 जागांची बोलणी नक्की केली आहे आणि उरलेल्या जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. “ती तुम्ही जाहीर करा,” असे राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे जाणवते, आणि यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “शेवटच्या क्षणी मतदारसंघामध्ये अदलाबदल होऊ शकते.” यावर चर्चा सुरू आहे, त्यामुळे 85-85 चा आकडा चुकला तर त्यात काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. राऊत यांच्या मते, “महाराष्ट्रात आम्ही 175 जागा जिंकणारच आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल.”

क्रिकेट आणि राजकारण

संजय राऊत यांनी क्रिकेटच्या उदाहरणाने चर्चेला रंगत आणली. “आम्ही आता 85 पर्यंत आलोय, सेंच्युरीसाठी 15 बाकी आहेत. दोन सिक्सर्स आणि एक फोर मारली की सेंच्युरी होईलच ना,” असे त्यांनी सांगितले. मुंबई क्रिकेटच्या पंढरीसमान असल्याने वानखेडेवर कोण कथी सेंच्युरी मारेल हे सांगता येत नाही, असे राऊत यांनी वक्तव्य केले.

काँग्रेस आणि शिवसेनेमधील वाद

काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गट यांच्यात वाद असल्याची चर्चा सध्या जोरात आहे, मात्र राऊत यांनी हे दावे फेटाळून लावले. “काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजिबात कोणतेही वाद नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी भाष्य करताना विचारले की, “महायुतीतील पक्ष रोज सागर बंगल्यावर जिलब्या खायला बसतात का?”

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटपाच्या चर्चाना महत्व असले तरी, शरद पवार, नाना पटोले, आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी या विषयावर सकारात्मकतेने विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून जागावाटपाची प्रक्रिया पुढे नेण्याची तयारी दर्शवली आहे. महाविकास आघाडीतील एकता कायम ठेवणे हे आता आवश्यक आहे, अन्यथा पराजयाची भीती निर्माण होऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र मध्ये मी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार आहे. त्यामुळे महायुतीने आपली उमेदवार सगळ्यात पहिले जाहीर करून दिले आहेत. आणि आता सर्व उमेदवार ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळत आहे ते आता निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">