काही महिन्यापूर्वी काँग्रेसचे नांदेड लोकसभेचे खासदार असलेले वसंत चव्हाण यांचे अलंकाली निधन झाले. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झालेली आहे. या जागेसाठी आता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवाराचे नाव काँग्रेस पक्षाकडून घोषित करण्यात आलेले आहे. आता भाजप कोणाला उमेदवारी देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे आणि त्यासोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची देखील घोषणा केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान देखील 20 नोव्हेबर रोजी होणार आहे. आणि निकाल हा 23 नोव्हेबर रोजी घोषित करण्यात येणार आहे. म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान होईल आणि एकाच दिवशी निकाल जाहीर करण्यात येतील. नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी आता काँग्रेसने उमेदवार जाहीर करून दिलेला आहे. नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे रवींद्र चव्हाण हे अलंकाली मृत्यू पावलेले नांदेड लोकसभेचे खासदार असलेले वसंत चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. काही दिवसा अगोदर अलंकाली ऑगस्ट महिन्यात त्यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मागच्या महिन्यात महाराष्ट्र दौरा केला होता त्यावेळेस अलंकाली मृत्यू पावलेली नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जाऊन राहुल गांधी नांदेडयांनी सातवनपर भेट दिली होती. त्यावेळेस ही राहुल गांधी यांनी सांगितलं होतं की लोकसभेची उमेदवारी त्यांचे सपुत्र रवींद्र चव्हाण यांना देणार असं सांगितलं होतं आणि खरंच त्यांनाच उमेदवारी घोषित केली.
नांदेड लोकसभा निवडणूक मध्ये भाजपचा काँग्रेस कडून तारून पराभव करण्यात आला होता. वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अलंकाली निधन झाले. वसंत चव्हाण गेल्यानंतर त्यांचा राजकीय कार्यभार त्यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांनी चालवावा असं काँग्रेस पक्षाला आणि ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना वाटत आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजपकडून कोणाला नांदेड लोकसभेची उमेदवारी मिळते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण मागच्या वेळेस भाजपच्या उमेदवाराचा तारुण पराभव वसंत चव्हाण यांनी केला होताच