शिवसेना ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचा जागा वाटपाचा टिळा अजुनी सुटलेला नाही आहे. या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण होताना दिसून येत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र घरामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हापासून निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेले आहेत. तेव्हापासून संपूर्ण राज्यभरात निवडणुकीचा दुराळा उठताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केलेली आहे या यादीत एकूण 99 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. आणि आता लवकरच महायुती मधून शिवसेना शिंदे गटाची आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही आहे. जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण होताना दिसून येत आहे. त्यांच्या चालेल्या या जागावाटपाच्या रस्सीखेच च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लूअर्जुन खर्गे यांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून घेतलेली शिवसेना ठाकरे गटाची भूमिका याच्यावर या बैठकी त विचारमंथन चालू असल्याचं माहिती समोर येत आहे.
अशातच महायुती मधील भारतीय जनता पार्टीने दुसरीकडे आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर करून दिलेली आहे. या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकूण 99 उमेदवारांचा समावेश केलेला आहे. आणि त्यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेले या 99 उमेदवारांची यादीत 13 महिलांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. कल्याण पूर्व मतदार संघातून विद्यमान आमदार यांचे तिकीट भारतीय जनता पक्षांनी कापलेला आहे. आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणारे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाकडून भोकर मतदारसंघांमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जागा वाटपाचा तिढा कधी सुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.