Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची चाहूल; नागरिकांना जाणवतोय गारठा, तापमान घटणार

By janshahi24news

Published on:

Follow Us
Maharashtra weather update
---Advertisement---

Maharashtra Weather Update : यंदा सततच्या पावसाने नागरिकांना त्रास दिल्यानंतर, महाराष्ट्रात आता थंडीने आपली चाहूल दिली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात गारठा जाणवू लागलाय. झपाट्याने कमी होणाऱ्या तापमानामुळे नागरिकांनी आता वळचणीला ठेवलेले स्वेटर, कानटोप्या बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

Maharashtra Weather Update

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी जाणवेल. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर दिसत असून, येत्या काही दिवसांत तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. हवामान विभागाने पुढील चार-पाच दिवसांत राज्यात हवामान कोरडे राहील, असंही सांगितलं आहे. मात्र, २४ तासांनंतर तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

उत्तर महाराष्ट्रात थंडीने जोर धरला असून अनेक भागांत गारठा जाणवत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता वाढली आहे. सोमवारी उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी किमान तापमान ११ अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलं. मराठवाड्यातील परभणीमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, ते फक्त ११.९ अंश सेल्सिअस होतं. तापमानाच्या घसरत्या आकडेवारीमुळे नागरिकांना थंडीची चाहूल लागली आहे. पावसाळ्यानंतर आलेली थंडी ही आरोग्यासाठी चांगली असल्याचं सांगितलं जात असलं, तरी अचानक गारठा वाढल्याने काही नागरिकांची तयारी अपुरी राहिली आहे.

Maharashtra Weather Update

कोकणात सध्या थंडीचा जोर कमी जाणवत असला, तरी पुढील काही दिवसांत कोकणातही तापमान कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र तापमान फारसा बदलणार नाही, असं प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केलं आहे. विदर्भातील तापमान सध्या स्थिर असून, पुढील पाच दिवसांत फारसा मोठा फरक दिसणार नाही.

Maharashtra Weather Update

नोव्हेंबरच्या शेवटी महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमान घसरणार आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमान १० अंशांपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागांतील लोकांनी आता योग्य तयारी करून ठेवावी, असा सल्ला हवामान तज्ञ देत आहेत.

Maharashtra Weather Update

थंडीच्या आगमनामुळे नागरिकांच्या जीवनशैलीतही बदल होताना दिसतोय. लोक आता सकाळी उशिरा बाहेर पडायला प्राधान्य देत असून, गरम कपडे, स्वेटर, आणि कानटोप्यांचा वापर सुरू झाला आहे. पथारीवर विकले जाणारे गरम पेय, भजी, आणि चहा यांना विशेष मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांसाठीही हा गारठा महत्त्वाचा मानला जातो, कारण थंडीमुळे रब्बी पिकांना फायदा होतो. मात्र, अचानक तापमान खूपच घसरल्यास काही पिकांना धोका होऊ शकतो.

महाराष्ट्रातील थंडी हळूहळू वाढत आहे आणि येत्या काही दिवसांत तापमान आणखी घटण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपली आरोग्याची काळजी घ्यावी, गरम कपड्यांचा वापर करावा, आणि थंड पदार्थांचा वापर कमी करावा. यंदाची थंडी अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता असल्याने राज्यभरात लोकांनी तयारीत रहायला हवं.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">