महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचं षडयंत्र: संजय राऊत यांचा अमित शहावर घणाघाती आरोप

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केलं आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारस्थान भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रचलेलं आहे. निवडणूक आयोगाला अमित शहा यांनी हाताशी धरलेला आहे. असा दावा देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकांचे रणसिंग फुकण्यात आले आहेत. या निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी येणार असून 26 नोव्हेंबरला पुन्हा विद्यमान विधानसभा स्थापन होणार आहे. याचाच आधार घेत खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलेला आहे.

खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील नव सरकार सत्तेवर येऊ नये यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हातीशी धरून पुढची तयारी केली आहे 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे 23 नोव्हेंबर रोजी निकाल आहे आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे एवढा कमी वेळ खरं तर दिला जात नाही आपर्यंतचा इतिहास तुम्ही पाहिला असेल. महाविकास आघाडी निवडणूक लढते आणि जिंकणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल तर संपूर्ण निकाल लागेपर्यंत 24 तारीख उजाडेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील त्यांना इथे पोहोचायला एक दिवस लागेल 26 तारखेला बैठका होणं विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणं राज्यपालांकडे दावा कर्ण यासाठी किमान वेळ लागतो तो दिलेला नाही सव्वीस नंबर पर्यंत सरकार स्थापन होऊ शकलं नाही. पुढे सहा महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लावायची असं फार मोठं कारस्थान अमित शहा यांनी रचल आहे. खासदार संजय राऊत हे म्हणाले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचे सरकार बनवू द्यायचं नाही हे राज्य महाराष्ट्राच्या शत्रूच्या हतात राहावे.. सुरत, अहमदाबाद आणि गुहाटीला ज्यांनी कांड केली. त्यांच्या हातात राज्य राहावं यासाठी राष्ट्रपती राजवट लागेलच लावायची म्हणून फक्त दोन दिवसाचा कालावधी सरकार स्थापन करण्यासाठी दिलेला आहे लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा व्यवहार कधी झालेला नाही असा व्यवहार अमित शह करता येत. ते महाराष्ट्राचे क्रमांक एकचे शत्रू आहेत बाकी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या दुश्मनांचे हस्तक आहेत अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">