आज निवडणुकीच्या तारखा होतील जाहिर; केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Maharashtra election 2024: महाराष्ट्र मध्ये आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तारखा संदर्भातील सर्व मतदारांना आणि राजकीय पक्षांना लागून होती आता सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण आज 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली आहे.

महाराष्ट्रातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर ला संपणार आहे. त्यामुळे कार्यकाळ संपण्याआधी नवीन विधानसभा गठीत करण्यात येणे केंद्रीय निवडणूक आयोगासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे की विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात देण्याआधी निवडणूक आणि निकाल पूर्ण होतील असे म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा काय असू शकतात.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी 28 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत निवडणूक तिच्या तारखांबाबत सांगितले होते. त्या पत्रकार परिषदेत राजीव कुमार म्हणाले होते की आम्ही सर्व महाराष्ट्रातील स्थानिक राजकीय पक्षांच्या बेटी घेतलेल्या आहेत. सर्व आणि राष्ट्रीय पक्षांची प्रत्यक्ष संवाद साधला. राज्यातील पोलीस महासंचालक आयुक्त यांची भेट घेतली. त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचे निर्देश दिले. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, बसपा, आम आदमी पार्टी, नॅशनल काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, आम्ही अशा सर्व पक्षांच्या भेटी घेतल्या. आम्हाला या सर्व पक्षांनी दिवाळीचा मुद्दा सांगितला होता दिवाळीच्या वेळेस सर्व लोकांना सुट्टी असतात म्हणून दिवाळीचा वेळ पाहून तारका घोषित करण्यात याव्या अशी विनंती सर्व पक्षांनी केलेली आहे असं निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले होते.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. निवडणूक त्याआधीच होईल असं राजीव कुमार यांनी सांगितला आहे. महाराष्ट्र राज्यात घरांची संख्या एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. या मतदारांपैकी महाराष्ट्रात पुरुष 4.59 कोटी मतदार आहेत. आणि महिला मतदारांची संख्या ४.६४ कोटी इतकी आहे. महाराष्ट्र राज्यात नव तरुणांची म्हणजेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे नव तरुणांची एकूण संख्या 11.48 लाख इतकी आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले की तेच नवतरुण आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील. आम्ही दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींना मतदान करण्याची विनंती करणार आहोत शक्य झालं तर वृद्ध व्यक्तींना आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देऊ असं राजीव कुमार म्हणाले आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">