Maharashtra assembly election 2024 : राज्यातील येत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मुंबईमध्ये असलेले शिवाजी पार्क मैदान येथे चार प्रमुख पक्ष्यांनी प्रचारसभा घेण्यासाठी अर्ज देऊन मागणी केलेली आहे. पण सर्वांना एकच दिवस प्रचार सभेसाठी मैदान हवे असल्यामुळे चारही पक्षांमध्ये तीळा निर्माण झालेला आहे. मनसे, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या चार पक्षांमध्ये 17 नोव्हेंबर 2024 रोजी प्रचार सभेसाठी मैदान लागणार असल्यामुळे तीळा निर्माण झालेला आहे. पण हे मैदान प्रचारसभेसाठी मनसेला दिले जावे अशी मागणी करण्यात येत आहे. कारण मनसेने सर्वात आधी शिवाजी पार्क मैदानावर प्रचार सभा घेण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर धरलेला आहे. आणि निवडणुकीच्या प्रचाराचा जोराने धुराळा सुरू झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे आणि मतदानाची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. या तारखासमोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या प्रचारासाठी धुराळा सुरू झालेला आहे. आणि राज्यातील राष्ट्रीय आणि स्थानिक पक्ष जोराने तयारीला लागलेले आहेत. आता राजकीय वर्तुळात संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकीच्या प्रचार सभांचा धळाका लागलेला पाहायला मिळणार आहे. मुंबईमध्ये अनेक मैदाना आहेत पण सर्वात जास्त डिमांड शिवाजी पार्क मैदानाला असल्यामुळे त्या मैदानाची एवढी मागणी केली जात आहे.
विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी नियोजन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कधी प्रचार सभा घ्यायची याचे नियोजन सर्व पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार धुराळा 18 नोव्हेंबर 2024 रोजी थांबणार आहे. सर्वात जास्त सर्व राजकीय पक्षांच्या सभा या 17 नोव्हेंबर 2024 ला रविवारी या दिवशी पाहायला मिळतील. त्या शेवटच्या प्रचारसभेसाठी साठी मुंबईमध असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरून चार पक्षांमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. शिवाजी पार्क हे मैदान मनसेच्या प्रचार सभेसाठी मिळावी अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलेली आहे. कारण 17 नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी चार पक्षांनी अर्ज दाखल केलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), भारतीय जनता पार्टी (भाजप), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट हे ते चार पक्ष आहेत. मैदान मिळण्यासाठी अर्ज करणारे पण सर्वात आधी अर्ज मनसे या पक्षाचा आल्यामुळे मैदान मनसेलाच मिळावी ही मागणी मनसेनेते यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आलेली आहे.