10वी च्या विद्यार्थ्यांच टेन्शन कमी करण्याची बातमी आता समोर येत आहे. आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना 35 पेक्षा कमी आणि वीस पेक्षा जास्त गुण मिळाले तरीही अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. यासंदर्भातली तरतूद नवीन अभ्यासक्रम आराखड्यामध्ये करण्यात आलेली आहे. यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा देणे किंवा एखाद्या विशिष्ट शेर्यासह प्रमाणपत्र हस्तांतरित करणे. किंवा अकरावी मध्ये प्रवेश घेणे असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
आनंदाचेत्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उंच शिक्षण घ्यायचं नाही आहे. अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे आणि विज्ञान विषयाची फी कायमची माफ केली जाणार आहे. अशी एक नवीन तरतूद या अभ्यासक्रम आराखड्यात शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेली आहे. आता विद्यार्थ्यांना 35 पैकी फक्त 20 मार्क जरी मिळाले तरी देखील त्या विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश मिळणार आहे. शिक्षण मंडळाचा हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. कारण आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे ताण कमी करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येईल.
शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी काय म्हणाले….?
शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले. की विद्यार्थ्यांसाठी हा घातक निर्णय आहे. आपल्याला फक्त पदवीधरांची खोटी संख्या वाढवायची आहे. की गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे आहे. हे एकदाच शासनाने ठरवलं पाहिजे. आज जागतिक परतवारीची जे अभ्यास असतात त्याच्यामध्ये 2020 साली भारत हा जगामध्ये 33 क्रमांक चा देश आहे. शिक्षणाच्या दर्जाच्या दृष्टीने आणि इथून पुढच्या काळामध्ये जागतिकीकरणांमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे नोकरी मिळणार आहेत. आणि तशाच ठिकाणी विज्ञान अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळे पासिंग न करता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान कौशल्य मिळतील हा प्रयत्न करण्याची गरज आहे. जर सरकारला परीक्षा सोप्या करून निकालच वाढवायचे असतील. तर माझी अशी सूचना राहील की जन्माच्या दाखल्या बरोबरच पदवीचे प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्यांना सरकारने देऊन टाकाव. याचं कारण असं की खूप वाईट परिस्थिती येते आपल्याकडे जे वेगवेगळे सर्व येतात किती विद्यार्थी त्या पदवीला लायक आहेत. किंबहुना पदवी घेऊन ये विद्यार्थ्यांना साधे अर्ज लिहिता येत नाहीत अशा स्थिती मध्ये अशा प्रकारचे विचार करण्यापेक्षा गणित सोपं कसं शिकवता येईल गणिताची गोडी कशी लागेल. विज्ञानाची गोडी कशी लागेल. याचं कारण जयकृष्णमूर्ती म्हणतात गणित आणि विज्ञान हे फक्त विषय नाही आहेत. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतो. आणि गणिता विषयी विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विकसित करतो. आणि म्हणून ही त्यांच्या व्यक्तिमत्वाशी असे निगडित विषय आहेत. त्यामुळे मार्कांशी खेळ करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचं समग्र ज्ञान कसे मिळेल. संकल्पना कशा सिद्ध होतील. आणि त्यातून ते विद्यार्थी जास्तीत जास्त त्या क्षेत्रामध्ये तज्ञता कशी प्राप्त करतील. हा दृष्टिकोन सरकारचा पाहिजे. पदवीधारकांची संख्या वाढून हा प्रश्न सुटणार नाही. अशी प्रक्रिया शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी एबीपी माझा ला दिलेली आहे.