Manoj jarage Patil Dasara melava: मराठा समाजाचा गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरागे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण केले. पण राज्य सरकारने अजून मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. दसऱ्यानिमित्ताने आज श्री शेत्र नारायण गड बीड मध्ये मनोज जहांगे पाटील यांचा दसरा मेळावा घेतला पडला. या दसरा मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात होता. मनोज जरंगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरण्याचे विधान देखील केलं होत. आज श्री शेत्र नारायण गड बीड येथे दसरा मेळाव्यात बोलताना राजकीय भूमिकेबद्दल मोठे संकेत मराठा बांधवांना दिलेले आहेत. मनोज जहांगी पाटील म्हणाले आचारसंहिता लागेपर्यंत थांबा आचारसहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका काय ठेवायची हे सांगणार आहे असं म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सूचना दिल्या आहेत.
मनोज जरागे पाटील म्हणाले….?
सर्व मराठा बांधवांच्या मनामध्ये जे आहे तेच मी करणार आहे. मी फक्त एवढे सांगतो आचारसंहिता लागल्यानंतर आपली मुख्य भूमिका काय राहील हे मी तुम्हाला सांगेल आपल्याला आता आचारसंहिता लागेपर्यंत थांबायचं आहे. मी सरकारला सांगतो तुम्हाला सुट्टी नाही पण आपल्याला आचारसहिता लागेपर्यंत थांबावं लागेल आणि तुम्ही सर्वांनी माझा ऐकायचं. सरकार काय करतो हे आपण सर्वांनी पाहायचं आणि मग आपण निर्णय घ्यायचा तुमच्या सर्वांच्या मनामध्ये जे काही आहे. ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ती माझी जबाबदारी आहे. मी तुमची शान वाढवल्याशिवाय थांबणार नाही. असं विधान करत म्हणून जरांगे पाटील यांनी आपल्या राजकीय भूमिकेबद्दल मोठे विधान केले आहेत.
आपल्यावर जर अन्याय होणार असेल तर आपल्याला आपल्या लेकरांसाठी लढावच लागेल आणि नाकावर टिचून जर सरकार निर्णय घेणार असेल तर मोठी उलथा पालक करावीच लागणार असं मनोज जरांगे पाटील बीड मधील श्री शेत्र नारायण गडावर दसरा मेळाव दरम्यान सरकारला इशारा दिलेला आहे. आपल्याला या वेळेस मोठी उलथापालत करावीच लागणार याशिवाय पर्याय नाही असं मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यात म्हणाले.