Hit and run incident in Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये हिट अँड रन, एका व्यक्तीचा मृत्यू, चार गंभीर जखमी

By janshahi24news

Published on:

Follow Us
Hit and run incident in Ahilyanagar
---Advertisement---

Hit and run incident in Ahilyanagar : आतापर्यंत हिट अँड रनच्या घटना प्रामुख्याने पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या, पण आता अहिल्यानगरसारख्या शांत शहरातही अशा दुर्दैवी घटनांचा अनुभव येऊ लागला आहे. मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात घडलेल्या अशा प्रकारच्या एका दुर्घटनेने शहरवासीयांना हादरवून सोडले आहे. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Hit and run incident in Ahilyanagar

महात्मा फुले चौक हा नेहमीच वर्दळीचा भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या चौकात अचानक एका पांढऱ्या रंगाच्या XUV 500 गाडीने नियंत्रण गमावून रस्त्यावरील नागरिक, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Hit and run incident in Ahilyanagar

अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ माजली. लोकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. जखमींना तत्काळ मदत मिळावी म्हणून काही स्थानिकांनी पुढाकार घेतला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर्सनुसार जखमींची प्रकृती गंभीर आहे, मात्र त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.

Hit and run incident in Ahilyanagar

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी वेगाने वाहन चालवण्याचा हलगर्जीपणा आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी जखमींना धीर देत त्यांचे उपचार वेळेत आणि प्रभावीपणे होण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे जखमींच्या कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.

या अपघातामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चालकाला काही वैद्यकीय अडचण होती का, की वाहनाच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातातील वाहन जप्त करण्यात आलं असून चालकाचा शोध घेतला जात आहे.

या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाला या परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत अधिक दक्ष होण्याची गरज आहे. विशेषतः वर्दळीच्या भागात स्पीड ब्रेकर, सिग्नल व्यवस्था आणि वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त वाढवला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच वाहनचालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याची आणि वाहनं काळजीपूर्वक चालवण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

या घटनेने अहिल्यानगरच्या शांत वातावरणाला तडा जाऊन, वाहतुकीसंबंधी सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा विचार करण्यास भाग पाडलं आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे, अन्यथा अशा हृदयद्रावक घटनांचा पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">