Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. या स्टार कपलच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. ऐश्वर्या- अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा तर चर्चेत आहेतच, पण यामध्ये अभिनेत्री निम्रत कौरचं नावही जोडलं जात आहे. अनेकांच्या मते, अभिषेकचं अफेअर निम्रत कौरसोबत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यावर परिणाम झाला असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे त्यांचं लग्न धोक्यात आहे असं मानलं जातंय.
या चर्चांच्या मागे आणखी एक गुपित दडलं आहे. ऐश्वर्या रायचं (Aishwarya Rai) एकेकाळी एका मोठ्या उद्योगपतीसोबत लग्न ठरलं होतं, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा उद्योगपती दुसरं तिसरं कोणी नसून हॉटमेलचे संस्थापक सबीर भाटीया (Sabir Bhatia) आहेत. सबीर भाटीयाचं नाव ऐश्वर्याच्या आयुष्यात आल्याच्या या अफवेने चर्चांना आणखी वेग दिला आहे.
सबीर भाटीया: कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक
सबीर भाटीया हे नाव तंत्रज्ञानाच्या जगात खूप मोठं आहे. ते हॉटमेल या इमेल सेवेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1996 साली हॉटमेलची स्थापना केली आणि ती कंपनी अवघ्या 18 महिन्यातच यशाच्या शिखरावर पोहोचली. या यशामुळे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला, आणि 1997 साली सबीर भाटीयांनी हॉटमेल जवळपास 400 मिलियन डॉलर्सना विकली. या सौद्यामुळे सबीर भाटीयांचं नाव जगभरात गाजलं आणि त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली.
आज सबीर भाटीयांची एकूण संपत्ती 1660 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी हॉटमेल विकल्यानंतर अनेक आलिशान वस्त्र, गाड्या, आणि मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. एकेकाळी त्यांच्या आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या, पण त्यानंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत विवाह केला आणि सबीर भाटीयासोबतच्या तिच्या नात्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यातील तणाव
बॉलिवूडमधील सर्वात आदर्श कपल मानलं जाणारं ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नातं सध्या संकटात असल्याचं बोललं जातंय. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंब एकमेकांपासून दूर राहिल्याचं दिसून आलं आहे. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातही या दोघांनी वेगवेगळ्या वेळेला हजेरी लावली, त्यामुळे त्यांच्या नात्यातील अंतराची चर्चा रंगली. त्यातच अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. सध्या बच्चन कुटुंबाकडून किंवा ऐश्वर्याच्या कडून या चर्चांवर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. मात्र, या चर्चांमुळे बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.